शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

मुख्यमंत्र्यांनी ऊसदरासाठी आता तिजोरी उघडावी : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 20:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊसदर द्यावा, लागेल ती मदत केली जाईल, त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच ही घोषणा केली असावी, आता त्यांनी तिजोरी उघडावी,

ठळक मुद्देहंगामाबाबत सरकार-कारखानदारांनी ठरवावेमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साखर उद्योगाला मदत करण्यासाठी राज्याची तिजोरी खाली करावी.

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना एफआरपी अधिक दोनशे रुपये ऊसदर द्यावा, लागेल ती मदत केली जाईल, त्यासाठी सरकारची तिजोरी खाली करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच ही घोषणा केली असावी, आता त्यांनी तिजोरी उघडावी, असे आवाहन करत कोणत्याही परिस्थितीत ‘एफआरपी अधिक दोनशे रुपये’ घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

शेतकरी संघटनांनी केलेली मागणी, बाजारातील साखरेचे दर व बँकांकडून मिळणारी उचल यामध्ये तफावत असल्याने संघटनांच्या मागणीप्रमाणे शेतकºयांना दर देऊ शकत नाही, अशी भूमिका घेत बुधवारपासून जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खासदार शेट्टी यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले, कारखानदारांनी गाळप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी सरकार व कारखानदारांनी काय ते ठरवावे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात येऊन ‘एफआरपी अधिक दोनशे’ रुपये उसाचा दर जाहीर केला आहे. त्यासाठी साखरेचा बाजारातील किमान दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये करतो, निर्यात साखरेबाबत बँक, केंद्र सरकार व कारखाने यांच्यामध्ये त्रिस्तरीय करार व राज्य सरकारकडून लागेल ती मदत करण्याची ग्वाही जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या घोषणा फडणवीस यांनी पूर्ण अभ्यासाअंतीच केल्या असणार यात माझ्या मनात शंका नाही. आता त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. कारखान्यांनी हंगाम बंद करून कोणाची कोंडी केली हे मला माहिती नाही, हंगामाबाबत सरकार व कारखानदारांनी ठरवावे पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे साखर उद्योगाला मदत करण्यासाठी राज्याची तिजोरी खाली करावी.मागणी मान्य झाल्याशिवाय माघार नाहीएफआरपी अधिक २00 रुपये घेतल्याशिवाय ‘स्वाभिमानी’मागे हटणार नसल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान,बुधवारी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी गाळप बंद ठेवले. ‘शाहू’चे सुमारे ८०० टन, तर ‘वारणा’चे ४०० टन ऊस ‘राजाराम’ कारखान्यात आणून गाळप केल्याचे समजते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर